Monday, January 21, 2019

प्रजासत्ताक भारत...??? मराठी कविता... Marathi Kavita... Marathi Poem...


गुलामगिरीतून केव्हाच
स्वतंत्र झाला भारत
राजकारण्यांनी केली
देशाची दुर्दैवी गत..... {१}
 

निर्भयाला अजूनही
मिळाला नाही न्याय
आजही स्त्री सोसते
कुटुंबाचा अन्याय..... {२}
 

भारतीय लोकांची 
मनेच आहेत लहान
सांगा कसे बोलावे ?
माझा भारत महान..... {३}
 

कोणे एकेकाळी भारतातून
सोन्याचा निघत होता धूर
जर आज डोकावून बघितले 
तर दिसतो अंधश्रद्धेचा पूर..... {४}
 

कधी बदलेल हे चित्र ?
कधी थांबेल भ्रष्टाचार ?
माणूस म्हणून वागण्याचा
कधी येईल शिष्टाचार ?..... {५}
 

प्रजासत्ताक भारत झाला तरी
जनतेला नाही अधिकार
झुगारून खोटे प्रकार सारे
कधी होईल खऱ्याचा स्वीकार ?..... {६}
 
 
 

No comments:

Post a Comment